Posts

भूसर्वेक्षणाचा शून्य मैल दगड, नागपूर (स्थापना – इ.स. १९०७).

Image
  Nagpur’s Zero Mile Stone of Land Survey देशाची उपराजधानी तसेच ऑरेंजसीटी हीच  नागपुर  (Nagpur) शहराची ओळख जनसामान्यांमधे प्रचलित आहे. मात्र याच शहराची सुमारे सव्वाशे वर्षांपासून आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे देशाचा केंद्रबिंदू. भौगिलीक दृष्ट्या हे शहर देशाच्या मध्यभागी असणारे शहर म्हणून प्रचलित आहे. देशाचा केंद्रबींदू ही ओळख  ब्रिटीशकालीन भारतात या शहराला  देण्यात आली होती. त्याचे प्रतिक म्हणून शून्य मैलाचा दगड (zero mile stone ) या शहरात दिमाखाने उभा आहे. हा दगड आणि त्याच्या प्रतिकात्मक स्तंभाची उभारणी इ.स. १९०७ मध्ये करण्यात आलेली आहे... Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पवित्र दीक्षा भूमी (Deekshabhoomi) ( नागपूर,१४ ऑक्टोबर इ.स. १९५६ )

Image
नागपूर  शहर म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी. ‘ऑरेंज सिटी’ अशी या शहराची ओळख. एक निवांत, ऐसपैस शहर, जिथे आपण शांततेने, मनसोक्त हिंडूण्याचा आनंद घेऊ शकतो. इथल्या खास नागपुरी तिखट पदार्थांचा आणि संत्राबर्फीचा आस्वाद घेत आपण येथील अनेक पर्यटनस्थळ फिरतो. मोठे शहर असूनही या शहराने  जो एक निवांतपणा जपला आहे त्याला खरच तोड नाही. नागपूर शहर फिरण्याचे  माझे अनेक  कारणं  होते , त्यातील महत्वाच मुख्य कारण होतं ते येथील दीक्षा भूमीला (Deekshabhoomi) भेट देण्याचं... Read more

World Heritage Site of Amer Fort in Jaipur (Built by King Mansingh in 16th Century)

Image
जागतिक वारसा असलेला जयपुरचा आमेर किल्ला ( (बांधकाम – राजा मानसिंहद्वारा इ.स.१६ व्या शतकात)   राजस्थान मधील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणजेच  जयपुरचा  आमेर किल्ला (Amer Fort). आमेर हे खरे पाहता एक शहर आहे जे राजधानी जयपुर पासुन 11 किमी अंतरावर आहे, येथील किल्ला म्हणजेच आमेर किल्ला. पर्यटक आमेर किल्ल्यास  विविध नावांनी ‌ओळखतात जसे ‘अंबर पॅलेस, आमेरचा किल्ला, आमेर का किला’ इत्यादी. हा किल्ला १६ व्या शतक़ात राजा मानसिंह यांच्याद्वारे बांधला गेला. या किल्ल्याचे नाव अंबा माता या नावावरून ठेवण्यात आले आहे. कारण याला अंबर किल्ला म्हणूनही ओळखले जाते... Read more

Unforgettable Jantar Mantar City of Astronomy, Jaipur (Period of Creation 1724 to 1734)

Image
  खगोलशास्त्राची अविस्मरणीय जंतर मंतर नगरी, जयपूर ( निर्मिती कालावधी इ.स. १७२४ ते १७३४ ) जंतर मंतर (Jantar Mantar) हा शब्द एकला की एक तर आपल्याला काहीतरी जादू आठवते किंवा लहानमुलांशी निगडित एखादा खेळ. मात्र जयपूर मधील शहरात जंतरमंतर (Jantar Mantar) हा शब्द जोडला गेला आहे तो येथील एका जगत्मान्य वास्तूशी, जिचे स्वरूप आणि काम बघून आपण थक्क होतो. येथील जंतर मंतर (Jantar Mantar) म्हणजे काही जादूचे खेळ नाही, तर ही आहे एक खगोल शास्त्राची वेधशाळा. मात्र या वेध शाळेच्या निर्मितीचा काळ, त्याची भव्यता आणि आजचे तिचे स्वरूप बघितले की खरच असे वाटते की किती मोठ्या ज्ञानाची साठवणूक याठिकाणी करून ठेवण्यात आलेली आहे.  आज अनेक यंत्र, संगणक अनेक सोयीसुविधा निर्माण झालेल्या आहेत. विज्ञानाने आज खूप मोठा पल्ला गाठलेला आहे. परंतु ही वेधशाळा पाहून समजते की, त्याकाळी अवकाशाचा वेध  घेण्यासाठी, त्याच्या अंतरंगातील विविध गोष्टी जाणून घेण्यासाठी किती अभ्यास करून, कष्ट घेऊन हे सर्व उभारले असेल.... Read more

Hawa Mahal ! A special palace of Rajput women in the royal family, Jaipur, Rajasthan (Built in 1799).

Image
राजघराण्यातील रजपूत स्त्रियांचा खासा हवामहल, जयपुर,राजस्थान ( बांधकाम इ.स. १७९९). राजस्थान म्हणजे भारतीय संस्कृती , स्थापत्यकला, खाद्यसंस्कृती आणि लोकसंस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे. येथील कला, संस्कृती आणि येथे असणाऱ्या अनेक पुरातन वास्तू, राजमहाल आणि बागबगीचे म्हणजे पर्यटनासाठीचा मोठा खजिना आहे. राजस्थानच्या प्रत्येक शहरात, गावात आपल्याला अनेक महाल, वास्तू आजही खूप चांगल्या अवस्थेत दिसून येतात. राजस्थानची राजधानी असणाऱ्या जयपूर या गुलाबी शहरालाही असाच मोठा ऐतिहासिक वारसा आहे. येथील राजमहाल, किल्ले अतिशय सुंदर आहेत. त्यांच्या निर्मितीचा, तेथील वैभवाचा इतिहास जाणून घेणे अतिशय रंजक आहे.  राजस्थानचे गुलाबी शहर अशी ओळख असणाऱ्या जयपूरमधील बाडी चौपड याठिकाणी असणारा हवामहल (Hawa mahal) हा महाल म्हणजे राजपुतांचा शाही वारसा आहे. हा महाल म्हणजे  वास्तुकला आणि संस्कृतीचा अनोखा मिलाफ आहे. राजस्थानच्या सर्वात प्राचीन वास्तूंपैकी ही एक वास्तू आहे. पर्यटकांसाठीचे हे सर्वात मोठे आकर्षण आहे. या महालाला अनेक खिडक्या आणि झरोके असल्या...

Damadi Masjid, the wonder of architecture ! (Established, 1567, Ahmednagar)

Image
  कामगारांनी दमडी जमवून बांधलेली आणि स्थापत्यशास्त्राचा अदभुत नमुना असणारी अहमदनगरची  दमडी मशीद (स्थापना, इ.स. १५६७, अहमदनगर). आपल्या देशात अनेक प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमूना असनाऱ्या वास्तू आहेत. अनेक राजवाडे, महाल, मंदिर, मशिदी, कबरी, विविध लेणी या सगळ्यांचा त्यात समावेश आहे. या सगळ्याला एक इतिहास आहे. या वास्तुंच्या वैभव संपन्नतेच्या, त्या बांधण्यासाठी आलेल्या खर्चाच्या अनेक कहाण्या प्रचलित आहेत. मुघलकालीन वास्तूशैलीच्या खर्चा संबधाच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहेत. मुघलांनी, निजामानी अनेक मशिदी, किल्ले आणि महाल बांधले. त्या प्रत्येकाच्या बांधकामाची, त्यासाठी वापरलेल्या संपत्ती विषयीच्या  बऱ्याच चर्चा आपण ऐकलेल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातील   अहमदनगर   या शहरात निजामकालीन  काळात बांधण्यात आलेली एक अशी मशीद (Masjid) आहे, जी काही कामगारांनी मिळून एक एक दमडी  जमवून बांधली होती. आणि विशेष म्हणजे य...

क्रांतिकारक चापेकर बंधूं स्मारक, सन २००५ मध्ये स्थापित (पुणे, चिंचवड, महाराष्ट्र)

Image
Revolutionary  Chapekar Brothers Monument, established in year 2005 (Pune, Chinchawad, Maharashtra) पुणे शहराला जशी सांस्कृतिक ओळख आहे, तसेच हे शहर पारतंत्र्याच्याकाळात अनेक क्रांतिकारकांच्या वास्तव्याने आणि त्यांच्या साहसी घटनांनी पुनीत झालेले म्हणूनही या शहराची ओळख सांगता येईल.  देशासाठी हौतात्म्य पत्क़रणाऱ्या चापेकर बंधूंच्या (Chapekar Brothers) वास्तव्याने पुनीत झालेला चापेकर वाडा म्हणजे अलौकिक अनुभव देणारी वास्तु आहे. इतिहासच्या पानातील हे एकमेव कुटुंब की,ज्या घरातील तीन मुले देशासाठी फ़ासावर गेली. अशा या महापुरुषांच्या आठवणींचे स्मरण करूण देणारा हा वाडा… Read more